🌼🌼🌼हिंदू पूजा पद्धतीमध्ये नैवेद्य म्हणजे काय? 🌼🌼🌼
देवाला “निवेदनीय” असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय.
म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.
तंत्रसार या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे
नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
त्यात म्हंटले आहे की “जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे.
ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे.
त्यालाच “नैवेद्य” म्हणतात.
ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे.
त्यालाच “नैवेद्य” म्हणतात.
1) भक्ष्य- गिळता येण्यासारखे,
2) भोज्य- चावून खाता येईल असे,
3) लेह्य- चाटता येईल असे,
4) पेय- पिता येईल असे आणि
5) चुष्य- चोखता येईल .....
2) भोज्य- चावून खाता येईल असे,
3) लेह्य- चाटता येईल असे,
4) पेय- पिता येईल असे आणि
5) चुष्य- चोखता येईल .....
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पावा.”
तंत्रासारातील मूळ श्लोक पुढील प्रमाणे-
निवेदनीय यद द्रव्यं, प्रशस्तं प्रयतं तथा |
तद भक्ष्यार्हम पंचविधं नैवेद्यमिति कथ्यते |
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च, पेयं चुष्यं च पंचमम |
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै निवेदयेत ||
तद भक्ष्यार्हम पंचविधं नैवेद्यमिति कथ्यते |
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च, पेयं चुष्यं च पंचमम |
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै निवेदयेत ||
विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा [तिखट सांजा नाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा. - पहा सांज्याच्या साटोऱ्या ] किंवा श्रीखंड प्रिय आहे.
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा [तिखट सांजा नाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा. - पहा सांज्याच्या साटोऱ्या ] किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दुध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.
नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा X असे चिन्ह करून मग त्याच्या वर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊन मग नैवेद्य दाखवावा.
या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
तुलसीपत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
सोने, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा.
डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.
तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे.
म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.
मग नैवेद्याचे पात्रा भोवती डावीकडून उजवी कडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे.
नंतर “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा” असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा.
त्यावेळी आपला दावा हात आपल्या हृदया जवळ असावा, मान झुकलेली असावी.
असे करून झाले की “मध्ये पानीयं समर्पयामि” असे म्हणून उदक द्यावे.
म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत { इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी “अमुकदेवताभ्यो” म्हणत आहे} “अमुकदेवताभ्यो नम: नैवेद्यं समर्पयामि” असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे.
[ उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न, भाज्या, कोशिंबिरी इत्यादी षड्रस अन्नाचा असावा.
नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे “प्रसादात” रुपांतर होते.
त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा “प्रसाद” देतो हे योग्य आहे.
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
थोडावेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.
आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो.आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे.
अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊन जातो. मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते. आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो. आणि मग आपले जीवनच पवित्र, सुगंधी बनून जाते.आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे आकळायला लागते .............
अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊन जातो. मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते. आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो. आणि मग आपले जीवनच पवित्र, सुगंधी बनून जाते.आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे आकळायला लागते .............
No comments:
Post a Comment