🌼🌼🌼जन्माला आलेला प्रत्येक माणुस मरेपर्यंत अविश्रांत धडपड करीत असतो . जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत त्याची ही धडपड चालतच असते . अशी अविश्रांत धडपड करणार्या माणसाला विचार करण्यास वेळच सापडत नाही . त्यामुळे या माणसांची विचार करण्याची शक्तीच दिवसे दिवस कमकुवत होत जाते . विचार करण्यासाठी माणसाला कुठेतरी थांबावे लागते . जो थांबु शकतो आणि जो निवांतपणे विचार करु शकतो त्यालाच जीवनांत नवे नवे मार्ग दिसू लागतात . ज्याला जीवनांत सुखी व्हायचे असेल त्याला जीवनांत निरनिराळ्या कारणांसाठी धावत असताना थांबायचे कुठे ? हे समजले पाहिजे . सर्वसामान्य लोकांना थांबायचे कुठे ? हेच समजत नाही . अशा लोकांच्या वाट्याला अशांत , अयशस्वी , संतप्त व दुखी जीवन येते .
पैसा-सत्ता संपती किंवा मान-सन्मान -किर्ती यासाठी बहुतेक लोक जीवापाड राबत असतात . त्याच प्रमाणे मुलांना , नातवंडांना पैशाची व इतर कशाचीही कमतरता कधीच पडू नये अशी त्यांची धारणा असते . या मोहापायी हे लोक मिळेल त्या अनिष्ट मार्गाने पैसा मिळवीत असतात . या सर्व धडपडीत हे लोक एक दिवस" राम " म्हणतात व त्यांनी मिळवलेला पैसा त्यांच्या मुलांच्या व नातवंडांच्या हातात अलगद येवून पडतो . अनिष्ट मार्गाने मिळविलेला पैसा कोणालाच लाभत किंवा पचत नसतो . शिवाय अनिष्ट मार्गाने संपती व पैसा मिळविताना या लोकांना सतत मानसिक ताण सहन करावा लागतो .
मानसिक तणावामुळे या लोकांच्या शरीरावर व मेँदुवर परिणाम होवून त्यांना अल्सर , प्रेशर , मधुमेह , पक्षघात , मानसिक रोग वगैरे नाना प्रकारच्या रोगांना सामोर जावेँ लागते व मेँदुवर परिणाम झाल्यामुळे मनःस्ताप होवून व मनःशांती हरवून त्यांची भ्रमिष्टा सारखी अवस्था होते . त्याचप्रमाणे मुलांच्या व नातवंडांच्या हातांत विनासायास संपती व पैसा आल्यामुळे त्यांची बुध्दी भ्रष्ट होते . मौज -मजा , चैन -चंगळ करण्यात व विविध व्यसनापायी सर्व पैसा ते खर्च करून टाकतात व प्रसंगी पैसा , संपत्तीसाठी कोर्ट कचेर्या किंवा खून मारामार्या सुध्दा करतात . या सर्व उलाढालीत या लोकांची मुले व नातवंड अक्षरशः कफल्लक व कर्जबाजारी होतात व प्रसंगी जीवही गमावून बसतात . म्हणून पैसा मिळविताना माणसाने कुठे थांबले पाहिजे हे त्याला कळणे आवश्यक आहे . बापाने मुलांसाठी अमर्याद पैसा मिळवित रहाणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे . बापाने फक्त मुलांसाठीच मर्यादित पैसा मिळवावा [ नातवंडांसाठी नाही मिळवायच ] याचा अर्थ असा की , बापाने मुलांना आवश्यक ते शिक्षण ध्यावे व थोडफार पैसा जीवनांत स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी ठेवावा . "थांबायचे नेमके ठिकान हेच " हे संपत्ती व पैसा मिळविणार्यानी लक्षात ठेवणे त्याच्या व समाजाच्या हित्ताचे आहे .
त्याच प्रमाणे कित्येक लोकांना वर्षा -वर्षाला संतती प्राप्त होत असते . "प्रत्येक वर्षाला एक कँलेँडर " अशी कित्येक लोकांची परिस्थिती असते . या लोकांना कुठे थांबायचे हेच कळत नाही " आल्लहा व देवाच्या कृपेने ही संतती होत असते व संतति प्रतिबंधक उपाय योजना करणे म्हणजे पाप " अशी त्यांची प्रामाणिक समजूत असते व त्या त्या धर्मातील अंधश्रध्दाधीन व स्वार्थी राजकीय पुढारी व धर्ममार्तंडसुध्दा त्या लोकांची तशीच समजूत करून देतात . येथे सुध्दा कुठे थांबावे हे जर कळले नाही तर त्यामुळे त्या माणसांचा , त्याच्या मुलाबाळांचा व आखिल समाजाचा दैवदुर्विलास ओढविल्याशिवाय रहाणार नाही .
त्याच प्रमाणे व्यायाम करताना , खेळताना , पळताना , भांडताना , व्याख्यान -प्रवचन -किर्तन करताना , किँबहुना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत थांबायचे कुठे हे माणसाला कळणे , त्याच्या व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे .
नेपोलियन , हिटलर , सद्दाम हुसेन यांना कोठे थांबायचे हे समजले नाही म्हणूनच नेपोलियनला तुरूंगवास भोगावा लागला , हिटलरला आत्महत्त्या करावी लागली व सद्दाम हुसेनला अपयश , अपकिर्ती व नामुष्की पत्करावी लागली . थोडक्यात ज्याच्याजवळ "शहाणपण " आहे त्यालाच थांबावे कुठे हे अचूक समजते व जीवनांत तोच सुखी व यशस्वी होवू शकतो .
000।।जय श्री राम ।।000
लेखक - श्री वामणराव पै ।
लेखक - श्री वामणराव पै ।
No comments:
Post a Comment