🌼🌼🌼गीता🌼🌼🌼
जेव्हा फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जाते तेव्हा साधकाचे लक्ष आपल्या कर्मापेक्षा त्याच्या फळाकडे होणाऱ्या प्रगतीकडे वा त्या फळाच्या परिणामाकडे द्विगुणीत होत. ह्याचे दुष्परिणाम दोन. एक म्हणजे तो आपल्या प्रयत्नात कधीही पूर्णपणे एकरूप होवू शकत नाही आणि दुसरे म्हणजे दुष्परिणामाची चिंता त्याला आपल्या कर्मापासून मागे खेचते. मनाची ओढाताण होते.
महाभारतात गीता सांगण्याचे निमित्त हेच आहे. अर्जुनाला "आपण, आपल्या आप्तांची हत्या कशी करावी? मला पाप लागेल?" अशी चिंता भेडसावू लागली आणि त्याचे पर्यावसान त्याने आपले गांडीव जमिनीवर ठेवण्यात झाले. आता विचार केल्यास लक्षात येईल की अर्जुन हा, आपण आपल्या आप्तांची हत्या केली तर होणाऱ्या दुष्परिणामाचा (फळाचा) विचार करत होता. फळाची/प्रारब्धाची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि त्यामुळे त्याची भरकट झाली. भगवंतांनी त्याला समजावले की "बाबा रे! युद्धभूमीत तुझ्यासमोर जो आहे तो तुझा शत्रू आहे आणि त्याला पराभूत करणे हे तुझे कर्म आहे. त्यांचा वध केल्यावर काय होईल हा विचार करणे तुझे काम नाही.तर तू तुझे काम कर आणि बाकीचे माझ्यावर सोड." आणि ह्याच्यातुन आपल्या धर्मग्रंथाचा जन्म झाला.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।

No comments:
Post a Comment