Monday, 26 June 2017

🌼🌼🌼*दूसरे की निंदा करिए और अपना घड़ा भरिए*🌼🌼🌼


हम जाने-अनजाने अपने आसपास के व्यक्तियों की निंदा करते रहते हैं: जबकि हमें उनकी वास्तविक परिस्थितियों का तनिक भी ज्ञान नही होता। निंदा रस का स्वाद बहुत ही रुचिकर होता है सो लगभग हर व्यक्ति इस स्वाद लेने को आतुर रहता है।
वास्तव में निंदा एक ऐसा  मानवीय गुण है जो सभी व्यक्तियों में कुछ न कुछ मात्रा में अवश्य पाया जाता है। यदि हमें ज्ञान हो जाये कि पर निंदा का परिणाम कितना भयानक होता है तो हम इस पाप से आसानी से बच सकते हैं।
गुरुदेव जी अक्सर एक कहानी सुनाते हैं- राजा पृथु एक दिन सुबह सुबह घोड़ों के तबेलें में जा पहुंचे। तभी वहीं एक साधु भिक्षा मांगने आ पहुंचा। सुबह सुबह साधु को भिक्षा मांगते देख पृथु क्रोध से भर उठे। उन्होंने साधु की निंदा करते हुए बिना विचारे तबेलें से घोडें की लीद उठाई और उसके पात्र में डाल दी। साधु भी शांत स्वभाव का था सो भिक्षा ले वहाँ से चला गया और वह लीद कुटिया के बाहर एक कोने में डाल दी। कुछ समय उपरान्त राजा पृथु शिकार के लिए गए। पृथु ने जब जंगल में देखा एक कुटिया के बाहर घोड़े की लीद का बड़ा सा ढेर लगा हुआ है उन्होंने देखा कि यहाँ तो न कोई तबेला है और न ही दूर-दूर तक कोई घोडें दिखाई दे रहे हैं। वह आश्चर्यचकित हो कुटिया में गए और साधु से बोले "महाराज! आप हमें एक बात बताइए यहाँ कोई घोड़ा भी नहीं न ही तबेला है तो यह इतनी सारी घोड़े की लीद कहा से आई !" साधु ने कहा " राजन्! यह लीद मुझे एक राजा ने भिक्षा में दी है अब समय आने पर यह लीद उसी को खाना पड़ेगी। यह सुन राजा पृथु को पूरी घटना याद आ गई। वे साधु के पैरों में गिर क्षमा मांगने लगे। उन्होंने साधु से प्रश्न किया हमने तो थोड़ी-सी लीद दी थी पर यह तो बहुत अधिक हो गई? साधु ने कहा "हम किसी को जो भी देते है वह दिन-प्रतिदिन प्रफुल्लित होता जाता है और समय आने पर हमारे पास लौट कर आ जाता है, यह उसी का परिणाम है।" यह सुनकर पृथु की आँखों में अश्रु भर आये। वे साधु से विनती कर बोले "महाराज! मुझे क्षमा कर दीजिए मैं आइन्दा मैं ऐसी गलती कभी नहीं करूँगा।" कृपया कोई ऐसा उपाय बता दीजिए! जिससे मैं अपने दुष्ट कर्मों का प्रायश्चित कर सकूँ!" राजा की ऐसी दुखमयी हालात देख कर साधु बोला- "राजन्! एक उपाय है आपको कोई ऐसा कार्य करना है जो देखने मे तो गलत हो पर वास्तव में गलत न हो। जब लोग आपको गलत देखेंगे तो आपकी निंदा करेंगे जितने ज्यादा लोग आपकी निंदा करेंगे आपका पाप उतना हल्का होता जाएगा। आपका अपराध निंदा करने वालों के हिस्से में आ जायेगा।
यह सुन राजा पृथु ने महल में आ काफी सोच-विचार किया और अगले दिन सुबह  से शराब की बोतल लेकर चौराहे पर बैठ गए। सुबह सुबह राजा को इस हाल में देखकर सब लोग आपस में राजा की निंदा करने लगे कि कैसा राजा है कितना निंदनीय कृत्य कर रहा है क्या यह शोभनीय है ??  आदि आदि!! निंदा की परवाह किये बिना राजा पूरे दिन शराबियों की तरह अभिनय करते रहे।
इस पूरे कृत्य के पश्चात जब राजा पृथु पुनः साधु के पास पहुंचे तो लीद का ढेर के स्थान पर एक मुट्ठी लीद देख आश्चर्य से बोले "महाराज! यह कैसे हुआ? इतना बड़ा ढेर कहाँ गायब हो गया!!"
साधू ने कहा "यह आप की अनुचित निंदा के कारण हुआ है राजन्। जिन जिन लोगों ने आपकी अनुचित निंदा की है, आप का पाप उन सबमे बराबर बराबर बट गया है।
*गुरुदेव जी कहते हैं-  जब हम किसी की बेवजह निंदा करते है तो हमें उसके पाप का बोझ भी उठाना पड़ता है तथा हमे अपना किये गए कर्मो का फल तो भुगतना ही पड़ता है, अब चाहे हँस के भुगतें  या रो कर। हम जैसा देंगें वैसा ही लौट कर वापिस आएगा!*

|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||

Sunday, 25 June 2017

*♻क्रोधावरील उपाय संयम* ♻


एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
 "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.

Friday, 16 June 2017

एक हृदयस्पर्शी बोध-कथा
॥ माणुसकीचा झरा ॥
एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याीच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.
‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’
त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.
त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.
‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.
‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.
‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.
‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.
‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.
‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.
‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या
‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.
‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.
‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.
परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.
त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.
‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.
तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!
अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे!

Tuesday, 21 March 2017

🌼🌼🌼

रामदासांची सुसंवाद सूत्रे 

🌼🌼🌼

बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
‘हेच समजून उत्तर देणें। दुस-याचें जीविंचे समजणे। मुख्य चातुर्याची लक्षणें। तीही ऐंसी।।’
अर्थात, सर्वात पहिले, दुस-या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचे आहे ते नीट समजून घ्या आणि मगच त्याच्या बोलण्याचा हेतू समजावून घ्या. त्या हेतूप्रमाणे तुमचे उत्तर ठरवा. हीच चातुर्याची लक्षणे आहेत.
बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
त्या पहिल्या शिका-याचा हेतू जाणून न घेता दुस-या शिका-याने पहिल्याच्या सांगण्यावरच भरंवसा ठेवून ते जंगल सोडले, तर पहिल्या शिका-याला ते संपूर्ण जंगल आयतेच किंवा बाहेर घालविणा-या एकटय़ालाच मिळेल. याच्या उलट दुस-याने हा आपल्याला हाकलवण्याचा पहिल्याचा कट आहे हा हेतू समजावून घेतला तर तो चतुर ठरेल.
सूत्र २ :
‘नेणतेंपण सोडूं नये। जाणपणों फुगों नये।
नाना जनांचे हृदये। मृदू शब्दें उकलावे।।’
जो नेता विविध लोकांशी संबंध ठेवून असतो, अशा नेत्याला समर्थ रामदासांची ही ओवी फारच उपयुक्त ठरेल. या ओवीनुसार अशा लोकनेतृत्वाने स्वत:च्या ज्ञानाने अहंमन्य होऊन आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गाशीही बोलण्याचे टाळू नये.
किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यास ते ध्यानात ठेवून लोकांशी झालेल्या संवादातून अशी माहिती काढावी की, जेणेकरून मृदू शब्दांतून लोकांचे मनोगत जाणण्याची विद्या हस्तगत करावी. लोकांशी सातत्याने संबंध येणा-या प्रत्येक व्यवस्थापकासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
सूत्र ३ :
‘जगामध्ये जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र।’
ज्या कुणाला चांगले बोलण्याची कला हस्तगत झालेली आहे, असा माणूस जगमित्र होत असतो. लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या प्रभावाने जिंकून घेणारे काही जण असतात. असे लोक प्रभावी नेते ठरतात. प्रभावी व्यवस्थापक ठरतात.
सूत्र ४ :
‘कठिन शब्दें वाईट वाटतें।
हें तो प्रत्ययास येतें।
तरी मग वाईट बोलावें तें।
काय निमित्य।।
पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येतें।
तरी मग कर्कश बोलावें तें।
काये निमित्य।।’
जे पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे क्रियेला जशी प्रतिक्रिया तसेच अनुचित शब्दाला अनुचित प्रतिशब्दच आपल्याला ऐकू येणार. हे माहीत असूनही आपण अनुचित का बोलावे बरे?
आपल्याशी जर एखादी व्यक्ती रागावून बोलली तर आपल्याला ज्याप्रमाणे वाईट वाटते, त्याप्रमाणे इतरांशी बोलताना दुस-याच्या मनाचा विचार करावा व इतरांशी बोलताना त्यांना बोचेल किंवा वाईट वाटेल असे बोलू नये. कारण ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. याचे भान ठेवूनच लोकांशी बोलावे.
संदर्भ व सौजन्य : प्रहार

Sunday, 19 March 2017

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतील लेख..

॥ हजार तासांची घरातली शाळा..... ॥

शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.
याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.
तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
 टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये
संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते
यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
राजीव दीक्षित म्हणायचे की राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध माध्यमातून या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार विद्यार्थी, पालक यांना वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.

 रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.
भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.
रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)
हेरंब कुलकर्णी 

आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त सूचना-Published in “Sunday Sakal”


आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त सूचना  
१. स्वत:त सुधारणा घडवून आणण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. आत्मविश्वास मिळवणं आणि वाढवणं हे प्रत्येकाला शक्य आहे हे लक्षात घेऊया.
२. स्वत:मध्ये रुजलेली भिती व असुरक्षितता ह्यांना ओळखा, जाणून घ्या. त्यावरचे उपाय शोधा. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या.
३. स्वत:ची शरम वाटून घेऊ नका किंवा किंव करू नका.
४. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. कुणाच्याही हातून चुका होऊ शकतात. तशीच आपल्याही हातून चूक होऊ शकते. त्यामुळे निराश होऊ नका. स्वत:ला क्षमा करा.चूकांमधून शिका आणि पुनरावृत्ती टाळा.
५. इतरां पेक्षा आपण कमी आहोत ही भावना मनातून काढून टाका.
६. आपला स्वत:शी संवाद (self talk)  सतत चालू असतो. तो सकारात्मक होतो आहे ह्याकडे लक्ष्य द्या.
७.. इतरांकडून दयेची, सहानभूतीची अपेक्षा करू नका. त्यानं तुमची आत्मप्रतिमा दुबळी होईल व आत्मविश्वास कमी होईल.
८. तुमच्या बलस्थानांचा सतत विचार करा, ती शोधून काढा, त्यावर लक्ष केंद्रित करा.
९. मिळालेल्या लहानशा यशाबद्दल सुद्धा स्वत:ला शाबासकी देण्याची सवय ठेवा, स्वत:ला प्रोत्साहन देत रहा.
१०. घडून गेलेल्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातली चांगली बाजू लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
११. अपयश हा आयुष्याचा भाग आहे. त्यानं हताश होऊ नका. सकारात्मक विचार करा. पुन्हा प्रयत्न करा.
१२. योग्य त्यावेळी मदत मागण्यात लाज बाळगू नका. आयुष्यात प्रत्येकाला मदत लागते हे लक्षात ठेवा.
13.स्वत:ला relaxed अवस्थेत ठेवण्याची कौशल्ये आत्मसात करा म्हणजे तणावाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्थिर राहाल व आत्मविश्वास डळमळणार नाही.
१४. तणाव नियोजनासाठी आवश्यक तेंव्हा वेळ न दवडता तज्ञांची मदत घ्या. कारण तणावाखाली असाल तर आत्मविश्वास मिळवणं/वाढवणं अवघड आहे. 

Thursday, 16 March 2017


🌼🌼🌼

Manual for Happy Family

🌼🌼🌼


समृध्द, सुखी कुटुंब
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात ,फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक उर्जा भरून राहिली आहे असं वाटतं . भले मग ते घर सांपत्तिक दृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो. आपल्यालाही त्यांच्या वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून एक प्रकारचा मोकळेपणा आणि सकारात्मक संवेदना जाणवतात. आपल्यालाही तेथे वारंवार जावसं वाटतं तसेच आपलंही घर, आपलंही कुटुंब तसं असावं, असं वाटतं. असं कुटुंब “समृध्द ” असतं .
ह्या समृद्धीचे सहा सोपान असतात. प्रत्येक व्यक्तीची सकारात्मक मानसिकता, प्रत्येकाचं उत्तम आरोग्य, एकमेकांमधील विश्वासावर, आदरावर, प्रेमावर आधारित नातेसंबंध, दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, सुख किंवा दुख: वाटून घेण्याची वृत्ती आणि अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत समाधानी रहाण्याची, एकोप्याने राहण्याची वृत्ती.
आता हे सगळं जमवून आणायचं असेल तर कुटुंबातील प्रत्येकासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येकाला काही नियम समजून घ्यायला लागतील आणि आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. आपण तीन पिढयांचे कुटुंब गृहीत धरुया. उदा. घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणजे आजी आजोबा , मधली पिढी म्हणजे नवरा बायको व तरुण पिढी म्हणजे मुले.
सर्वांसाठी टिप्स -१. कुटुंब संस्थेवर विश्वास ठेवा. म्हणजेच इतरांबरोबर आनंदाने, स्नेह्बंधनाने आपण रहातो तेंव्हा सर्वांचंच व्यक्तिमत्व फुलू शकतं ह्यावर विश्वास ठेवा. . विपरीत परिस्थितून वर आलेल्या व्यक्ती, संपूर्ण कुटुंब आपण पहातो. त्यामागे व्यक्तीच्या कर्तृत्वा बरोबरच कुटुंबातील प्रेम , एकमेकांसाठी केलेला त्याग, धैयाने परिस्थितीशी दिलेली झुंज हे सगळं असतं.
२ . कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, भावनिक वीण ही वेगळी असू शकते. भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. भावनिक सहनशीलतेची पातळी वेगळी असू शकते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे लहान सहान कारणांवरून खटके उडणार नाहीत. मतभेद झाले तरी लवकर मिटतील. स्वस्थ कुटुंबासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे.
३.स्वत: भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या शांत, स्वस्थ आहोत का हे तपासा. कारण जेंव्हा व्यक्ती आतून स्वस्थ, शांत असते तेंव्हा आणि तेंव्हाच ती स्वत:ला आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. तसं नसेल तर त्यासाठी उपाय करा. एकमेकांशी किंवा विश्वासातल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या. स्वस्थतेसाठीचे व्यायाम करा. उदा. ध्यान, योगासने इत्यादी.
४. अहंकार आड येऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मतं असू शकतात हे मान्य करा. कुठल्याही प्रश्नावर टोकाची भूमिका टाळा. तुटेपर्यंत ताणू नका. सर्व कुटुंबासंदर्भातले काही निर्णय एकत्र चर्चा करून घ्या. ह्या प्रक्रियेमध्ये सर्वांची मते विचारात घ्या. एकमेकांशी बोलताना, वागताना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मला समोरच्याला आनंद द्यायचाय ही भावना महत्वाची.
५. जेष्ठ पिढीने तरुण पिढीला शक्यतो आवश्यक ते स्वातंत्र्य द्यावे. आमच्या वेळेला असं होतं असा धोशा लावू नये. काळ बदलत रहातो. आपल्यालाही बदलायलाच हवे हे लक्षात घ्यावे. त्याच बरोबर नवीन पिढीनेही जेष्ठांच्या सगळ्याच गोष्टी, विचार टाकावू आहेत असा विचार करू नये. त्यांना योग्य तो आदर द्यायला हवा. त्यांच्या सूचनांवर विचार करावा.
६. कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा संवाद असावा. त्यासाठी दिवसातील किंवा शक्य नसेल तर आठवड्यातील काही काळ , काही तास सर्वांनी एकत्र येउन कौटुंबिक किंवा साहित्य, संगीत इत्यादी विषयांवर गप्पा माराव्यात. इतरांचं ऐकून घेण्याची क्षमता, मदत मागण्याचा मोकळेपणा, आपण कुटुंबातील महत्वपूर्ण सदस्य आहोत ह्या धारणा स्वास्थ्यपूर्ण आहेत.
७. काळ बदलतो आहे. Technology चा वापर दैनंदिन आयुष्यात अपरिहार्य आहे. घरातील तरुण पिढी तो करणारच. त्यांना त्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायलाच हवं. पण त्याचा दुरुपयोग किंवा त्यातच वेळ काढत रहाणं ही भावनिक समस्या किंवा अस्वस्थतेला वाट मिळवून देणं असू शकतं. उदाहरणार्थ अती आणि अवेळी मोबाईल चा वापर, अति गेम्स इ. अशावेळी प्रेमाने समजावून सांगणं व त्यात यश येत नसेल तर तज्ञांची मदत घेणं अपरिहार्य आहे. सतत ओरडणं, दमदाटी करणं, आत्मसन्मान दुखावेल असे शब्द उच्चारणं ह्यातून फक्त वातावरण तणावपूर्ण राहिल. तरुण पिढीचीही जबाबदारी आहे की जेष्ठ जे सांगत आहेत त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी. जेष्ठांचा अनुभव व आपल्या बद्दल वाटणारा जिव्हाळा त्यामागे असू शकतो.
८. लग्न जमवणं हा एक महत्वाचा मतभेदाचा मुद्दा असतो. ह्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फक्त निवडीसाठीचे निकष काय असावेत ह्याबाबतीत मोकळेपणाने संवाद व्हावा उदा. निर्व्यसनीपणा, चारित्र्य, इत्यादी. परंतु कुठलंही दडपण आणू नये.
९ . सध्याच्या काळात मित्र मैत्रिणी असणं हे समाजव्यवस्थेचा भागच बनला आहे. त्याबाबतीत मुलां मुलींना टोकू नये. फक्त मर्यादांची व धोक्यांची जाणीव करून द्यावी. मुलामुलीनीही ही बाब समजून जबाबदारीने मैत्र जपावे. चांगला मित्र किंवा मैत्रीण हे बलस्थानही असू शकतं.
१०. सासू सून नातं हे नाजूक प्रकरण असू शकतं . पण ह्याही बाबतीत सासुबाईनी सुनेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आता काळ बदलला आहे. मुली सुशिक्षित असतात, त्यांची संसाराबाबत स्वतंत्र मतं असू शकतात हे लक्षात घ्यावं. त्याच बरोबर आपण निरुपयोगी झालो, आपला काळ संपला असं वाटून हताशही होऊ नये. सुनेनेही सासुला आवश्यक तो आदर द्यावा, सल्ला घ्यावा.
सासुसुनेच्या नात्यातील तणावांमुळे मुलावर विलक्षण ताण येऊ शकतो, हे दोघींनीही लक्षात घ्यावे. कारण तो एकाच वेळी मुलगाही असतो आणि पतीही.
११. घरात लहान मुलांसमोर कुणीच कुठलेही वादविवाद करू नयेत. अपशब्द उच्चारू नयेत. लहान मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ, कणखर होणं ही काळाची गरज आहे.
जुनी पिढी आणि नवीन पिढी ह्यांच्या दृष्टीकोनांमध्ये फरक असणारच पण सुवर्णमध्य काढता येणं ही कला आहे. एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना , आदर, प्रेम निर्माण झालं, “मी पणा ” सोडता आला की ते सहज शक्य आहे.
आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठीच आपला जगण्याचा प्रवास आहे. कुटुंबाचं प्रेम हे त्या प्रवासासाठी एक बलस्थान आहे.
डॉ. विद्याधर बापट