🌼🌼🌼नामसाधना 🌼🌼🌼
नामसाधनेची हि पथ्ये एखाद्याने काळजीपूर्वक पळून आपली नामसाधना नेटाने सुरु ठेवली तर नामसाधनेचे अनेक दिव्य अनुभव त्यास प्राप्त झाल्याशिवाय खचित राहणार नाहीत. तथापि, नामधारकानी आणखी एक महत्त्वाची गोष्ट नित लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे 'नामस्मरण' आणि 'नामोच्चारण' या दोहोतील फरक !पुष्कळसे साधक रोज खूप जप करतात; परंतु त्यापैकी बहुतेकजण केवळ 'नामोच्चारण' करताना दिसतात. त्यांच्याकडून नामस्मरण होताच नाही !
तेव्हा प्रथम नामस्मरण आणि नामोच्चारण यात काय फरत आहे
तेव्हा प्रथम नामस्मरण आणि नामोच्चारण यात काय फरत आहे
ते पाहू या. नामोच्चारण याचा अर्थ तोंडाने नामाचा केवळ उच्चार करणे असा होतो. तोंडाने राम, कृष्ण, दत्त, शिव यांचे केवळ नाम उच्चारणे म्हणजे नामोच्चारण होय. यात 'ॐ नम: शिवाय' , किंवा ' श्रीराम जय राम जय जय राम ' इ.मन्त्रजपांचाहीसमावेश होतो; परंतु या मंत्राजापाचा केवळ उच्चार करणे आणि नामस्मरण करणे यात खूप फरक आहे. कारण "नामस्मरण" याचा अर्थ तोंडाने नाम घेत असताना त्याच वेळी बिश्तमंत्राच्या दैवताचे स्मरणही मनात झाले पाहिजे. नामस्मरणात या शब्दातील ' स्मरण ' हा शब्द महत्त्वाचा आहे. नामोच्चारणात हे स्मरण नसते.
कबीरांनी याचे वर्णन करताना म्हटले आहे; कि"माला हातात फिरते आहे,आणि जीभ मुखात फिरते आहे ;परंतु मन मात्र
दशदिशांत फिरते आहे !"अश्या जपला एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो. अश्या वेळी मुखाने नामाचा उच्चार होत असला तरी मन रिकामे असल्याने ते नेहमीप्रमाणेच कुठेही भरकटत असते आणि त्यावेळी अनेक सांसारिक चिंता, विषय,
इत्यादीची गर्दी मनात होते. हे मनाचे भरकटणे तसे चोवीस तासच सुरु असते. याचे कारण आपली वृत्ती मुळातच बहिर्मुख
असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आपले मन ज्यात त्यात आपले नाक खुपसत असते; परंतु उपासनेचा मुल हेतू हा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे - आत्म्याकडे केंद्रीभूत करणे- हा आहे. त्याचा प्रवाह बदलाने व तो भगवंताकडे वळविणे हि महत्त्वाची गोष्ट आपल्याला साधावयाची आहे आणि केवळ नामोच्चारणाचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच संत नामदेवांनी या नामोच्चारणाला " वाचेचा गोंधळ " असे म्हटले आहे. ते म्हणतात,"
दशदिशांत फिरते आहे !"अश्या जपला एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो. अश्या वेळी मुखाने नामाचा उच्चार होत असला तरी मन रिकामे असल्याने ते नेहमीप्रमाणेच कुठेही भरकटत असते आणि त्यावेळी अनेक सांसारिक चिंता, विषय,
इत्यादीची गर्दी मनात होते. हे मनाचे भरकटणे तसे चोवीस तासच सुरु असते. याचे कारण आपली वृत्ती मुळातच बहिर्मुख
असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आपले मन ज्यात त्यात आपले नाक खुपसत असते; परंतु उपासनेचा मुल हेतू हा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे - आत्म्याकडे केंद्रीभूत करणे- हा आहे. त्याचा प्रवाह बदलाने व तो भगवंताकडे वळविणे हि महत्त्वाची गोष्ट आपल्याला साधावयाची आहे आणि केवळ नामोच्चारणाचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच संत नामदेवांनी या नामोच्चारणाला " वाचेचा गोंधळ " असे म्हटले आहे. ते म्हणतात,"
नाम घेता हे वैखरी | चित्त धावे विषयावरी |नाम रुप नाही मेळ | अवघा वाचेचा गोंधळ || " यासाठीच हा वाचेचा गोंधळ न करता स्मरण्युक्त नाम घेण्याबद्दल त्यांचा आग्रह आहे. ते पुढे म्हणतात-" नवल स्मरणाची ठेव | स्मरणामाजी प्रगटे देव |एक जनार्दनी नाम | नामी प्रगटे आत्माराम || "तथापि, अगदी सुरुवातीच्या कळत नाम आणि रूप यांचा मेल साधकाला कदाचित साधता येणार नाही.
बहिर्मुख मनाला एकदम उलट दिशेने वळवून अंतर्मुख करणे ती तारेवरची कसरत सर्वांनाच जमेल असे नाही, तथापि, हे न जमेल तरी साधकांनी निराश होण्याचे कारण नाही.कारण या संदर्भात श्री ब्रम्हचैतन्यमहाराज सांगतात कि, " नाम घेणे हे
महत्त्वाचे आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच ; पण ते तसे न राहिले तरी नाम घेताना रूपाचे स्मरण सुक्ष्ण रूपाने होत असतेच असते.
महत्त्वाचे आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच ; पण ते तसे न राहिले तरी नाम घेताना रूपाचे स्मरण सुक्ष्ण रूपाने होत असतेच असते.
उदाहरणार्थ एका गृहस्थाचे घरी ' राम ' नावाचा एक गाडी आहे आणि तो गृहस्थ " राम राम " असा जप करीत बसला आहे ;परंतु परंतु त्याचवेळी त्याचे लक्ष रामाच्या रुपाकडे नसून दुसरीकडेच आहे. त्याच्या मनात त्यावेळी अनेक संसारिक विषय
घोळत आहेत.अशा वेळी जर त्याला एकदम विचारले, कि " तुम्ही कोणाचेनाव घेत आहात ? " तर अर्थात, " रामाचे " असेच उत्तर तो देईल :परंतु हे उत्तर देताना त्याच्या मनात ' दाशरथी राम ' हीच व्यक्ती असणार, ' राम गडी ' हि व्यक्ती अर्थातच नसणार ! याचाच अर्थ असा, कि नाम घेताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये !"श्रीमन्ममहाराजांनी प्राथमिक अवस्तेतील नामधारकांना अशा प्रकारे मोठाच दिलासा दिलेला आहे. श्रीतुकाराम महाराजांनी नामधारकांच्या या अडचणीची कल्पना असावी असे वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात कि,
घोळत आहेत.अशा वेळी जर त्याला एकदम विचारले, कि " तुम्ही कोणाचेनाव घेत आहात ? " तर अर्थात, " रामाचे " असेच उत्तर तो देईल :परंतु हे उत्तर देताना त्याच्या मनात ' दाशरथी राम ' हीच व्यक्ती असणार, ' राम गडी ' हि व्यक्ती अर्थातच नसणार ! याचाच अर्थ असा, कि नाम घेताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये !"श्रीमन्ममहाराजांनी प्राथमिक अवस्तेतील नामधारकांना अशा प्रकारे मोठाच दिलासा दिलेला आहे. श्रीतुकाराम महाराजांनी नामधारकांच्या या अडचणीची कल्पना असावी असे वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात कि,
" नसे तरी मणी वसे | परी वाचे तरी वसो || "
कारण अगोदरच नामाचे माहात्म्य पाटणे अवघड आणि ते पटले तरी आलास झटकून मुखातून रोज नाम येणे त्याहून अवघड ! अशा परिस्थितीत ते नाम जिभेवर आले आहे हे देखील काही कमी भाग्याचे नव्हे ! नामस्मरण या शब्दातील ' स्मरण ' शब्द लक्षात ठेवून नामाधाराकानी नामाबरोबरच रूपाचे स्मरण करण्यास प्रयत्न अवश्य करायला हवा. कारण असे झाले तरच नामाचे अनुभव लवकर येतील यात शंका नाही.यासाठी एक युक्ती साधकांनी करून पहावी.
ती अशी कि नामस्मरणाला बसण्यापूर्वी प्रथम आपल्या इष्टदैवताच्या मूर्तीकडे किंवा तसबिरीकडे बराच वेळ एकाग्रतेने
पाहावे, नंतर डोळे मिटून ती मूर्ती डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करावा. शक्य तर जपापुर्वी मानास्पुजाही करावी. त्या योगे जप करताना इष्टदैवताची मूर्ती डोळ्यासमोर राहील. हे करताना प्रथम इष्टदैवताच्या मूर्तीच्या पायाकडे
पाहावे, नंतर डोळे मिटून ती मूर्ती डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करावा. शक्य तर जपापुर्वी मानास्पुजाही करावी. त्या योगे जप करताना इष्टदैवताची मूर्ती डोळ्यासमोर राहील. हे करताना प्रथम इष्टदैवताच्या मूर्तीच्या पायाकडे
टक लावून पहावे. नंतर एकेका अवयवावरनामाचे स्मरण करीत हळूहळू दैवताच्या मुखाकडे यावे, प्रथम मूर्तीच्या डोळ्यावर, नासिकेवर दृष्टी टाकीत नंतर हास्यमुखावर आणि त्यानंतर मंदहास्यावर आणि अखेर त्या मंद हास्यातील अवर्णतीय आनंदावर वृत्तीधारणा स्थिर करीत आपणही आनादामय होऊन जावे. अशा प्रकारचा
अभ्यास काही दिवस करीत राहिल्यास मनाची बाहेर भटकण्याची वृत्ती हळूहळू कमी होऊन ते अंतर्मुख होईल आणिमग नामसाधनेचे दिव्य अनुभव साधकाला आपोआप प्राप्त होतील.म्हणून ' नामोच्चारण ' आणि ' नामस्मरण ' या
दोहोतील फरक नित लक्ष्यात घेऊन साधकांनी नामोच्चारणाऐवजी ' नामस्मरण ' कसे होईल याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.
कारण नामोच्चारणाला संत एकनाथ चक्क ' विस्मरण ' च म्हणतात ! प्रसिद्ध संत त्यागराज स्वमींचेही असेच मत आहे.
त्यांना अखंड नामसाधनेच्याद्वारे प्रभूदर्शन झाले होते. आपल्या एका पडत ते म्हणतात, कि " स्मरणाशिवाय केलेल्या
नामसाधनेचा मुळीच उपयोग होत नाही. " कारण तेथे ' विस्मरण 'च आहे. स्मरण असेल तर ते भगवंताचे नसून ते इतर सांसारिक गोष्टीचे आहे. हे विस्मरण अर्थातच उपयोगाचे नाही. नामस्मरणाच्या वेळी इष्टदैवताची मूर्तीच डोळ्यापुढे उभी
राहिली पाहिजे. तसेच, नुसती जड मूर्ती उभी राहून चालणार नाही. ती मूर्ती चैतन्यमय असायला हवी. आणि अशी ती
चैतन्यमय प्रभूची सुहास्ययुक्त मूर्ती आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीकडे पहात पहात आपला जप व्हायला हवा ! हे साधू लागले, कि एक दिवस ' नामसमाधी 'ची अवस्था साधकाला प्राप्त होईल आणि त्यावेळी त्याचा जप त्याचा केवळ मुखानेच नव्हे तर त्याच्या रोमारोमातून होऊ लागेल आणि एका विलक्षण आनंदाची दिव्य अनुभूती त्या
त्यांना अखंड नामसाधनेच्याद्वारे प्रभूदर्शन झाले होते. आपल्या एका पडत ते म्हणतात, कि " स्मरणाशिवाय केलेल्या
नामसाधनेचा मुळीच उपयोग होत नाही. " कारण तेथे ' विस्मरण 'च आहे. स्मरण असेल तर ते भगवंताचे नसून ते इतर सांसारिक गोष्टीचे आहे. हे विस्मरण अर्थातच उपयोगाचे नाही. नामस्मरणाच्या वेळी इष्टदैवताची मूर्तीच डोळ्यापुढे उभी
राहिली पाहिजे. तसेच, नुसती जड मूर्ती उभी राहून चालणार नाही. ती मूर्ती चैतन्यमय असायला हवी. आणि अशी ती
चैतन्यमय प्रभूची सुहास्ययुक्त मूर्ती आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीकडे पहात पहात आपला जप व्हायला हवा ! हे साधू लागले, कि एक दिवस ' नामसमाधी 'ची अवस्था साधकाला प्राप्त होईल आणि त्यावेळी त्याचा जप त्याचा केवळ मुखानेच नव्हे तर त्याच्या रोमारोमातून होऊ लागेल आणि एका विलक्षण आनंदाची दिव्य अनुभूती त्या
साधकाला येईल आणि हे जसजसे अधिकाधिक साधू लागेल त्या प्रमाणात साधकदशेतून सिधावास्थेकडे साधकाचे मार्गक्रमण सुरु होईल. जे सिद्ध असतात त्यांना मुद्दाम नामरूपाचा मेळ घालावा लागत नाही. कारण त्यांचे नाम सतत चालू असते आणि रूप तर कायमच डोल्याप्य्ध्ये असते ! हि अवस्था हनुमंताला प्राप्त झाली होती. त्याच्या रोमारोमात एकाच राम भरून राहिला होता! हि अवस्था अनेक संतानाही प्राप्त झाली होती.महात्मा गांधी यांनी एकदा असे सांगितले होते, कि " मी व्यवहारात काहीही करीत असलो तरी रामनामाचा तंबोरा माझ्या हृदयात सतत वाजत असतो. " हि फार उच्च
अवस्था आहे आणि हि अवस्था प्राप्त झाल्यामुळेच ते 'महात्मा ' बनले !
अवस्था आहे आणि हि अवस्था प्राप्त झाल्यामुळेच ते 'महात्मा ' बनले !
श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची अशीच गोष्ट आहे.एकदा एक डॉक्टर त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आले. त्यावेळी
त्यांनी ' स्टेथोस्कोप ' त्यांच्या छातीला लावला आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण ' स्टेथोस्कोप
'मधून त्यांना हृदयाचे स्पंदन ऐकू येण्याऐवजी चक्क " श्रीराम जय राम जय जय राम " असा त्रयोदशाक्षरी मंत्रच ऐकू आला ! या अवस्थेलाच ' नामसमाधि ' असे नाव आहे. संत चोखामेळा
यांची हि गोष्ट अशीच सांगतात. त्यांच्या कलेवरातूनही विठ्ठलनामाचा ध्वनी ऐकू येत होता ! उमडीचे महान सत्पुरुष श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांच्या अस्थीतून कितीतरी वेळ रामनामाचा ध्वनी लोकांना ऐकू आला व त्याचा उल्लेख गुरुदेव रानडे यांना पाठविलेल्या एका पत्रात शियेअंबूरावमहार
ाजांनी आवर्जून केला होता !
त्यांनी ' स्टेथोस्कोप ' त्यांच्या छातीला लावला आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण ' स्टेथोस्कोप
'मधून त्यांना हृदयाचे स्पंदन ऐकू येण्याऐवजी चक्क " श्रीराम जय राम जय जय राम " असा त्रयोदशाक्षरी मंत्रच ऐकू आला ! या अवस्थेलाच ' नामसमाधि ' असे नाव आहे. संत चोखामेळा
यांची हि गोष्ट अशीच सांगतात. त्यांच्या कलेवरातूनही विठ्ठलनामाचा ध्वनी ऐकू येत होता ! उमडीचे महान सत्पुरुष श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांच्या अस्थीतून कितीतरी वेळ रामनामाचा ध्वनी लोकांना ऐकू आला व त्याचा उल्लेख गुरुदेव रानडे यांना पाठविलेल्या एका पत्रात शियेअंबूरावमहार
ाजांनी आवर्जून केला होता !
अशा प्रकारे नामोच्चारण-नामस्मरण आणि शेवटी नामसमाधि अशा या तीन महत्त्वाच्या अवस्था असून नामसाधकांनी अखेरची अवस्था प्राप्त करून घेण्यसाठी स्वताच्या प्रयत्नाबरोबर भगवत्कृपेची भगवंताची प्रार्थना करणेही तितकेच आवश्यक आहे ! त्याचप्रमाणे भगवंतावर आणि आपण जे नाम घेतो त्यावर पूर्ण श्रद्धा असणे हेही तितकेच
महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment