अभंग म्हणजे जे कधी हि भंग होत नाहीत असे, जे काळाच्या ओघात नष्ट होत नाहीत असे ...संत तुकाराम महाराज.
आपल्या संतांनी आपल्याला अभंगाद्वारे अनेक ग्रंथ संपत्ती देऊन ठेवली आहे . त्या ग्रंथांचा आपण आदर करून पुरेपूर उपयोग करून आपले जीवन सत्कर्मी लावले पाहिजे.
आपल्या आयुष्यात माहित असलेले गुरु म्हणजे आई ,वडील शिक्षक आणि गुरुच. पण या सर्वांना सोडून आपले गुरु म्हणजे ग्रंथ हि आहेत , जे आपल्याला कोणते न कोणते ज्ञान देताच असतात.
आपण ज्ञान घेण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर करतो पण आजच्या आधुनिक युगात आपण माहिती ग्रंथामध्ये न शोधता सरळ संगणकातील आंतर्जालातून यालाच इंग्रजी शब्द मध्ये इंटरनेट मधून क्षणातूनच मिळवतो पण हि माहिती कोनिनाकोनी एखाद्या ग्रंथातूनच अथवा ज्ञानकोशाचे वाचन करून संगणकातील अंतर्जालात टाकलेली असते .
ग्रंथ हे आपल्याला अमाप ज्ञान देतात त्यासाठी ते आपल्याकडून त्याचे मूल्य त्याचा मोबदला मागत नाही . हिंदू धर्मात सर्वात मोलाचे स्थान ते देवाला व आपल्या पवित्र ग्रंथ भगवद गीतेला . आणि म्हणूनच सर्वात मूल्यवान हा ग्रंथच आहे . त्याच पध्दतीने आयुर्वेदात मोलाचा ग्रंथ चरक संहिता हा पण ग्रंथच आहे . प्रत्येक धर्माचा पवित्र एकनाएक ग्रंथच आहेत म्हणून ग्रंथ हेच आपले गुरु आहेत म्हणून हा बोध ग्रंथासाठी हि होतो .
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा ।
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ।
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा ।
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ।
No comments:
Post a Comment