Saturday, 12 January 2019

संस्कार ......
लहान मुलांच्यावर संस्कार म्हटले की, मराठी मध्यमवर्गिय किंवा उच्च मध्यमवर्गिय लोकांच्या डोळ्यांपुढे प्रथम 'शुभं करोति कल्याणमय', मुजं, देवाची प्राथना अशा प्रकारचीच चित्रे उभी राहतात. संस्कारांचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रुढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कॄत असे सोयिस्कर गणित मांडले जाते. या देशातल्या अपार दारिद्र्याशी टक्कर घेत जगणार्या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार करणे वगैरै परवडतच नाही.
जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत, त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिध्द होते ती खरी संस्कृतीः ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्याइअतकाच दुसर्यायही माणसाला निर्वेधपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यत आपण मानत नाही, तोपर्यतं आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून स्वतःचे आणि ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाचे जीवन आपल्या वागण्याने अधिक दुःखमय होणार नाही, अशा दक्षतेने जगण्याची जाणीव मुलांच्यात लहानपणापासूण निर्माण करणारे संस्कार कुठले याचा विचार सतत व्हायला हवा.
जी सुस्थित माणसे आहेत त्यांच्यावर तर अशा त-हेच्या चांगल्या सामाजिक जाणिवा जागृत करून मुलांना वाढविण्याची अधिक जबाबादारी आहे. कारण त्यांच्या वागण्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्या घरातल्या मुलांना, दुर्बल परिस्थितल्या मुलांना आधाराचे हात देण्याची सवय अधिक कटक्षाने लावावी लागते.
संस्कार --- पु.लं. देशपांडे

मुलांचा व्यक्तिमत्व विकास


मुलांचा व्यक्तिमत्व विकास
– डॉ विद्याधर बापट
आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास ” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्वाचं. असं व्यक्तिमत्व विशिष्ठ प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं ? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey). म्हणजेच आतलं विश्व शांत,स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं म्हणता येईल.
सुरवात महत्वाची – ह्या सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी. व्ही. वर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
व्यक्तिमत्व विकासातील काही महत्वाची साध्ये. – मुलांमध्ये रुजवायला हवं की – १. माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्या पेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. व निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्वं मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल.
२. माझं “आतलं ” विश्व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्विकारीन. ३. आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. ४. मी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. ५. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन.
६. ह्या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे.
दोन्ही दिशांनी (Inner Journey व Outer Journey ) करावयाच्या प्रयत्नांमध्ये मध्ये काय येतं? – वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग बनवण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर, आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम म्यानेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणा खाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, , नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक, व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization), ह्यासाठीची तंत्रे शिकून घेणे.
विकसित व्यक्तिमत्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात – १. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. २. ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात. ३. कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. ४. यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. ५. नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात ६. संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात. ६. आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते. ७. केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात. ८. स्वत: च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.
पालकांची जबाबदारी -
१. ह्या सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठींबा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुणावगुण टिपत असतात.
२. मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता ह्याकडे दुर्लक्ष्य करू नये. मोठा झाला की आपोआप सगळं ठीक होईल ह्या गैरसमजात राहू नये.
३. करियर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांच्यावर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे.
४. आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करीत राहणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.
समृद्ध व्यक्तीमत्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्ब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशु पक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी ( लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती ह्या गोष्टी जीच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी.
आजच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्य शिक्षण व आंतरिक स्वस्थता ह्या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.
---डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ञ

Wednesday, 4 July 2018

*AMOR FATI - नशिबाचा स्वीकार* 

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.  याचा अर्थ आहे "नशिबाचा स्वीकार". 

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे. 

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती. 

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

"अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली..." असा?
की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला,

 "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही."

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला,

"आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."

'आमोर फाटी' म्हणजे काय, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल..

आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टी खऱ्या स्वरुपात आनंदाने स्विकारणे. 

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या 'आमोर फाटी' कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

▪ कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,

▪ कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

▪ कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

▪ कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

▪ कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तथापि तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला *'आमोर फाटी'* म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे. 

जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.

एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...

बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...

सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं  थिंक बिग सांगणारं ठरेल...

हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...

आमोर फाटी हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी  रित्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे. 

चला *आमोर फाटी* स्विकारुया...

💐💐💐💐
कई लोगों की दिनचर्या हनुमान चालीसा पढ़ने से शुरू होती है। पर क्या आप जानते हैं कि श्री *हनुमान चालीसा* में 40 चौपाइयां हैं, ये उस क्रम में लिखी गई हैं जो एक आम आदमी की जिंदगी का क्रम होता है।
माना जाता है तुलसीदास ने चालीसा की रचना बचपन में की थी।
हनुमान को गुरु बनाकर उन्होंने राम को पाने की शुरुआत की।
अगर आप सिर्फ हनुमान चालीसा पढ़ रहे हैं तो यह आपको भीतरी शक्ति तो दे रही है लेकिन अगर आप इसके अर्थ में छिपे जिंदगी  के सूत्र समझ लें तो आपको जीवन के हर क्षेत्र में सफलता दिला सकते हैं।
हनुमान चालीसा सनातन परंपरा में लिखी गई पहली चालीसा है शेष सभी चालीसाएं इसके बाद ही लिखी गई।
हनुमान चालीसा की शुरुआत से अंत तक सफलता के कई सूत्र हैं। आइए जानते हैं हनुमान चालीसा से आप अपने जीवन में क्या-क्या बदलाव ला सकते हैं….

*शुरुआत गुरु से…*
हनुमान चालीसा की शुरुआत *गुरु* से हुई है…
श्रीगुरु चरन सरोज रज,
निज मनु मुकुरु सुधारि।
*अर्थ* - अपने गुरु के चरणों की धूल से अपने मन के दर्पण को साफ करता हूं।
गुरु का महत्व चालीसा की पहले दोहे की पहली लाइन में लिखा गया है। जीवन में गुरु नहीं है तो आपको कोई आगे नहीं बढ़ा सकता। गुरु ही आपको सही रास्ता दिखा सकते हैं।
इसलिए तुलसीदास ने लिखा है कि गुरु के चरणों की धूल से मन के दर्पण को साफ करता हूं। आज के दौर में गुरु हमारा मेंटोर भी हो सकता है, बॉस भी। माता-पिता को पहला गुरु ही कहा गया है।
समझने वाली बात ये है कि गुरु यानी अपने से बड़ों का सम्मान करना जरूरी है। अगर तरक्की की राह पर आगे बढ़ना है तो विनम्रता के साथ बड़ों का सम्मान करें।

*ड्रेसअप का रखें ख्याल…*
 चालीसा की चौपाई है
कंचन बरन बिराज सुबेसा,
कानन कुंडल कुंचित केसा।
*अर्थ* - आपके शरीर का रंग सोने की तरह चमकीला है, सुवेष यानी अच्छे वस्त्र पहने हैं, कानों में कुंडल हैं और बाल संवरे हुए हैं।
आज के दौर में आपकी तरक्की इस बात पर भी निर्भर करती है कि आप रहते और दिखते कैसे हैं। फर्स्ट इंप्रेशन अच्छा होना चाहिए।
अगर आप बहुत गुणवान भी हैं लेकिन अच्छे से नहीं रहते हैं तो ये बात आपके करियर को प्रभावित कर सकती है। इसलिए, रहन-सहन और ड्रेसअप हमेशा अच्छा रखें।
आगे पढ़ें - हनुमान चालीसा में छिपे मैनेजमेंट के सूत्र...

*सिर्फ डिग्री काम नहीं आती*
बिद्यावान गुनी अति चातुर, 
राम काज करिबे को आतुर।
*अर्थ* - आप विद्यावान हैं, गुणों की खान हैं, चतुर भी हैं। राम के काम करने के लिए सदैव आतुर रहते हैं।
आज के दौर में एक अच्छी डिग्री होना बहुत जरूरी है। लेकिन चालीसा कहती है सिर्फ डिग्री होने से आप सफल नहीं होंगे। विद्या हासिल करने के साथ आपको अपने गुणों को भी बढ़ाना पड़ेगा, बुद्धि में चतुराई भी लानी होगी। हनुमान में तीनों गुण हैं, वे सूर्य के शिष्य हैं, गुणी भी हैं और चतुर भी।

*अच्छा लिसनर बनें*
प्रभु चरित सुनिबे को रसिया, 
राम लखन सीता मन बसिया।
*अर्थ* -आप राम चरित यानी राम की कथा सुनने में रसिक है, राम, लक्ष्मण और सीता तीनों ही आपके मन में वास करते हैं।
जो आपकी प्रायोरिटी है, जो आपका काम है, उसे लेकर सिर्फ बोलने में नहीं, सुनने में भी आपको रस आना चाहिए।
अच्छा श्रोता होना बहुत जरूरी है। अगर आपके पास सुनने की कला नहीं है तो आप कभी अच्छे लीडर नहीं बन सकते।

*कहां, कैसे व्यवहार करना है ये ज्ञान जरूरी है*
सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा, बिकट रुप धरि लंक जरावा।
*अर्थ* - आपने अशोक वाटिका में सीता को अपने छोटे रुप में दर्शन दिए। और लंका जलाते समय आपने बड़ा स्वरुप धारण किया।
कब, कहां, किस परिस्थिति में खुद का व्यवहार कैसा रखना है, ये कला हनुमानजी से सीखी जा सकती है।
सीता से जब अशोक वाटिका में मिले तो उनके सामने छोटे वानर के आकार में मिले, वहीं जब लंका जलाई तो पर्वताकार रुप धर लिया।
अक्सर लोग ये ही तय नहीं कर पाते हैं कि उन्हें कब किसके सामने कैसा दिखना है।

*अच्छे सलाहकार बनें*
तुम्हरो मंत्र बिभीसन माना, लंकेस्वर भए सब जग जाना।
*अर्थ* - विभीषण ने आपकी सलाह मानी, वे लंका के राजा बने ये सारी दुनिया जानती है।
हनुमान सीता की खोज में लंका गए तो वहां विभीषण से मिले। विभीषण को राम भक्त के रुप में देख कर उन्हें राम से मिलने की सलाह दे दी।
विभीषण ने भी उस सलाह को माना और रावण के मरने के बाद वे राम द्वारा लंका के राजा बनाए गए। किसको, कहां, क्या सलाह देनी चाहिए, इसकी समझ बहुत आवश्यक है। सही समय पर सही इंसान को दी गई सलाह सिर्फ उसका ही फायदा नहीं करती, आपको भी कहीं ना कहीं फायदा पहुंचाती है।

*आत्मविश्वास की कमी ना हो*
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलधि लांघि गए अचरज नाहीं।
*अर्थ* - राम नाम की अंगुठी अपने मुख में रखकर आपने समुद्र को लांघ लिया, इसमें कोई अचरज नहीं है।
अगर आपमें खुद पर और अपने परमात्मा पर पूरा भरोसा है तो आप कोई भी मुश्किल से मुश्किल टॉस्क को आसानी से पूरा कर सकते हैं।
आज के युवाओं में एक कमी ये भी है कि उनका भरोसा बहुत टूट जाता है। आत्मविश्वास की कमी भी बहुत है। प्रतिस्पर्धा के दौर में आत्मविश्वास की कमी होना खतरनाक है। अपनेआप पर पूरा भरोसा रखें।
Image result for Hanuman Kirtan

Saturday, 24 March 2018

*श्रीराम वंदना*
शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं, हृदयाला स्पर्श करतात..!!!

नादातुनी या नाद निर्मितो 
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय र ाम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏See the source image

Tuesday, 27 February 2018



चाणक्य ने कहा था कि शत्रुता सिर्फ मूर्खों की ही होती है


आचार्य चाणक्य को आप और हम एक बेहतरीन नीतिशास्त्र, महान प्रशिक्षक और ऐसे अर्थशास्त्री के तौर पर जानते हैं जिनकी तुलना किसी से संभव नहीं है। चाणक्य के वचन, उनकी नीतियां और उनके आदर्श आज भी बहुत से लोगों का मार्गदर्शन कर रहे हैं।
इन सभी खूबियों के अलावा चाणक्य को राजनीति का भी अग्रदूत माना गया है। वे एक अतुलनीय डिप्लोमैट यानि कूटनीतिज्ञ, जो व्यक्ति और परिस्थिति के अनुसार सही और गलत जैसी बात कहते थे।

नास्ति बुद्धिमतां शत्रुः

उनके कथन जीवन के विभिन्न पहलुओं को छूते थे, उनका कहना था “नास्ति बुद्धिमतां शत्रुः”। इसका अर्थ है कि समझदार व्यक्ति का कोई शत्रु नहीं होता है।

समझदार व्यक्ति

लेकिन उनकी यह बात भी विवादों से घिरी है, बहुत से लोग ये मानते हैं कि समझदार व्यक्ति बहुत से लोगों के लिए खतरा बन सकता है। इसलिए ऐसे लोगों की कोई कमी नहीं होगी जो उसे अपने रास्ते से हटाने का प्रयत्न करे। तो फिर यह कैसा संभव है कि समझदार व्यक्ति का कोई शत्रु ना हो।

एकमात्र विकल्प

चाणक्य के अनुसार जिस तरह हमारा पैसा अगर किसी और के पास रहे तो वह हमारे किसी काम का नहीं होता, कुछ इसी तरह ज्ञान अगर सिर्फ किताबों में ही रहेगा, तो वह हमारे किसी काम का नहीं है। उसे ग्रहण करना ही एकमात्र विकल्प है।

शिक्षित इंसान

शिक्षित इंसान अगर सामने वाले व्यक्ति को सम्मान देना नहीं जानता, अपने अलावा वह किसी और की कद्र नहीं करता तो उसका वह ज्ञान भी किसी काम का नहीं है।

बुद्धिमान इंसान

लेकिन क्या वास्तव में एक बुद्धिमान इंसान शत्रुता से दूर रहने के बावजूद अपने लिए सफलता की राह चुन सकता है, अपनी सफलता की गारंटी ले सकता है।

बुद्धिमान इंसान

एक बुद्धिमान इंसान हर वो चीज करता है, हर वो पैंतरा आजमाता है जिसकी वजह से वह किसी लड़ाई-झगड़े या किसी द्वंद में ना पड़े। किसी क्लेश में ना पड़कर वह अपना बहुत सा समय बचा लेता है, निश्चित तौर पर वो अपना वह समय अपने काम में लगा सकता है, इस समय का प्रयोग वह अपनी क्षमता बढ़ाने के लिए कर सकता है।

अहंकार

मनुष्य हमेशा अपने अहंकार को शांत करने की कोशिश करता रहता है, वह यह नहीं सोचता कि इस चक्कर में वह अपने बहुत से कार्यों से दूर है। वह इस समय का उपयोग किसी सही स्थान पर कर सकता है। मनुष्य को समझना चाहिए कि किसी से शत्रुता मोल लेकर अपने लिए ही समस्या बुला रहा है।

समस्या का निर्माण

आपका क्रोध, आपका गुस्सा और अहंकार हमेशा आग में घी डालने का काम कर रहे हैं। ऐसा करके आप समस्या को सुलझाने की जगह अपने लिए नई समस्या का निर्माण कर रहे होते हैं।

समझदार इंसान

एक समझदार इंसान इस बात को भली-भांति समझता है कि बहस में पड़कर कुछ भी संभव नहीं है। अगर सामने वाला व्यक्ति मूर्ख है और आपकी बात को नहीं समझ रहा है तो निश्चित तौर पर चुप रहकर अपना कार्य करने में ही भलाई है। अपने तथाकथित सम्मान को बचाने के लिए कुछ भी करना व्यर्थ है।


Monday, 26 February 2018

नवमाध्यमांचं ‘बाळ’कडू (शोभा भागवत)

मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट अशी माध्यमं रोज बदलत आहेत, नवनवी रूपं धारण करत आहेत. मात्र, त्यांच्या वेगाशी, बदलांशी पाल्यांची सांगड कशी घालून द्यायची हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ‘गॅजेटमुक्त’ केलं तर मित्रमंडळींच्या तुलनेत मुलं मागं पडतील का, किंवा टीव्ही त्यांच्या मनासारखा बघू दिला तर ती ‘वाया’ जातील का, असे प्रश्‍न पालकांसमोर आहेत. एकीकडं बालचित्रपट, बालनाट्यं यांचं प्रमाण कमी झालेलं असताना रंजनाच्या नव्या ‘अवतारां’चा मुलांवर दुष्परिणाम होईल का? नव्या माध्यमांचा सकारात्मक उपयोग कसा करायचा?.... बालक-पालकांशी संबंधित अनेक प्रश्‍नांबाबत चर्चा.
सध्या लहान मुलं ‘बाहुबली’च्या प्रेमात आहेत. त्याच्यासारखी तलवार घेऊन, चिलखत घालून, ढाल घेऊन जोरदार उड्या मारणं, धावणं घरात चालू असतं. एक मुलगा आईला म्हणाला ः ‘‘मला लवकर मोठं व्हायचंय आणि ‘युद्ध’ करायचंय.’’ हाच मुलगा ‘हिरोशिमा डे’ला ‘‘बॉम्ब नको, युद्ध नको, आम्हाला शांती हवी,’’ अशी शपथही घेतो. काही काळांनी तो हे दोन्ही विसरून जातो आणि तिसऱ्याच कुठल्या तरी हिरोच्या प्रेमात पडतो.
मुलांना हिंसा ही गंमत वाटते आहे. त्यामुळंच त्यांचे खेळ हिंसक होत चाललेत. मुलांची भाषा, त्यांचे शब्द, आविर्भाव, हिंसक होत आहे. आपण जे निर्माण करतो आहोत, त्यामुळं मुलांच्या मनावर काय परिणाम होईल याची टीव्ही, चित्रपट, इंटरनेट, जाहिराती अशा नवमाध्यमांना चिंता नाही, फिकीर नाही. कारण मूल कुणाला कळलंय? आणि मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे?
मुलांचा विचार करायचा फक्त बालदिनाला. तोही त्यांना काही वस्तूंचं वाटप केलं, की आपली जबाबदारी संपली. केला बालदिवस साजरा. ‘‘पैशांसाठी वाट्टेल ते,’’ हे सगळ्या समाजाचंच सूत्र बनलं आहे. नवमाध्यमं का मागं राहतील? मुलांना वाईट कार्यक्रम दाखवू नका असा कोणी पालकांना सल्ला दिला, तर पालक म्हणतात ः ‘‘आम्ही थांबवू शकत नाही मुलांना. ती बघतातच.’’ त्यातून ती अस्वस्थही होतात. मुलांवर आणि मोठ्यांवरही नकळत अनेक परिणाम माध्यमं करतात. त्यातून माणसं नाटकी बोलायला लागतात. किंचाळून बोलतात. त्यांचे विचार, भाषा, पोशाख, अभिव्यक्ती सगळ्याला माध्यमं वळण लावतात. किती भडकायचं, कसा राग व्यक्त करायचा तेही नकळत माणसं टीव्ही, चित्रपटांतून शिकतात.
एकीकडं पर्यावरणरक्षणासाठी सबंध आयुष्य घातलेली माणसं आपण पाहतो आणि दुसरीकडं टीव्ही पुनःपुन्हा आपल्यावर काय आदळत राहतो? ‘हे सॉस खा’, ‘हा जॅम खा’, ‘हे सूप प्या’, ‘त्या नूडल्स खा’, ‘ही चॉकलेट्‌स आणा’, ‘ते त्रिकोण खा’, ‘डायपर्स आणा’ वगैरे वगैरे. हे सगळं वापरणं, खाणं, फेकणं, पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न फुकट घालवणार आहे, ही साधी बाब दुर्लक्षितच राहते.
तरुण मुलं मोबाईल वापरतात. मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या मोबाईलवर गप्पा चालतात. पालक फतवा काढतात. आठ वाजता मोबाईल पालकांकडं द्यायचा. त्यावर भांडणं होतात. तान्ही बाळंसुद्धा मोबाइलकडं एकटक पाहतात आणि काढून घेतला मोबाइल तर आकांततांडव!
सहविचार, माध्यमशिक्षणाची  गरज
आपण मुलांना जबरदस्तीनं आज्ञा पाळायला लावतो; पण त्यांच्याबरोबर सहविचार करत नाही. मुलांना मार देण्यावर आपला विश्‍वास असतो. त्यांना तडातडा बोलण्यावर विश्‍वास असतो; पण त्यांना माध्यमांचं शिक्षण देण्याविषयी आपण विचार करत नाही.
पूर्वी राजपुत्रांचं शिक्षण गुरुगृही का होत असे? राजवाड्यात शिक्षण होणं शक्‍य नव्हतं. म्हणून गुरुकुलात मुलं शेती करत, गुरं सांभाळत, सर्व कामं करत आणि त्याबरोबर अध्ययन करत. गुरुकुलातले ऋषी-मुनी म्हणजे शिक्षक नव्हते. त्यांची दिनचर्या वेगळी चालू असे. ते विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देत. परीक्षा घेत. पण शाळेत शिकवल्याप्रमाणं नाही.
आज आपण घरांचेच ‘राजवाडे’ करण्याच्या मागं आहोत का? आपल्या राजपुत्रांच्या, राजकन्यांच्या जीवनात भरपूर करमणूक आहे. खायला पिझ्झा, बर्गर, आईसक्रीम आहे, मोबाइल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, टॅब्लेट आहे, एमपीथ्री आहे, त्यांना अभ्यास बोअरिंग वाटला तर नवल ते काय?
माध्यमांचा परिणाम स्वप्रतिमेवरही होतो. चित्रपटात टीव्ही मालिकांमध्ये ज्या प्रकारचे कपडे मुली घालतात, तसे आपण आपल्या रोजच्या वातावरणात घालावेत का? टीव्हीसारखे ड्रेसेस घालण्याचा हट्ट मुलं धरतात, त्यांना पालक विरोध करतात आणि मुलं तर हट्ट सोडत नाहीत. गेल्याच्या गेल्या पिढीत पालक सांगत ः ‘चित्रपट घरात आणायचा नाही. तिथंच सोडून यायचा.’ आता मुलांना हे पटतच नाही. ती जणू कायमच माध्यमांच्या जगात जगत असतात.
माध्यमांचा वेगळा विचार
मध्यंतरी नाशिकच्या अभिव्यक्ती संस्थेनं ‘माध्यम-जत्रा’ केली होती. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आम्ही पुण्याच्या गरवारे बालभवनात ‘माध्यम-जत्रा’ केली. मुलांना माध्यमांची डोळस ओळख करून देण्याचा तो प्रयोग होता. त्यात एका स्टॉलवर वर्तमानपत्रं लावली होती आणि येणाऱ्याला एकेक टिकली दिली होती. ‘रोज तुम्ही वृत्तपत्रांतलं काय, सर्वांत जास्त वाचता त्यावर टिकली लावा,’ असं सांगितलं होतं. कुणी बातम्यांवर, तर कुणी जाहिरातीवर टिकली लावत होते. एका मुलीनं तर शाहरूख खानच्या गालावर टिकली लावली.
‘जाहिरातींची गंमत करा,’ असा एक खेळ होता. फुगवलेल्या पाकिटांमधून येणाऱ्या वेफर्सवर एका मुलानं लिहिलं ः ‘पैसे द्या मूठभर, वेफर्स घ्या चिमूटनभर.’’ ज्या वस्तूची कधी जाहिरात होत नाही, त्या शहाळं, हॅंगर, सेफ्टी पिन इत्यादींच्या जाहिराती मुलांनी करून लावल्या. एका चित्रपटाचा शेवट मुलांना दाखवला आणि तो कसा बदलाल, असा प्रश्‍न होता. मुलांनी त्यातले चुकीचे संदेश आणि चुकीची दृष्टी ओळखून शेवट बदलून दिला. ‘काय खावं- काय प्यावं- काय टाळावं,’ यात अनेक मांडलेल्या गोष्टी पाहून  मुलांनी त्यातून सुकी भेळ, राजगिरा वड्या, खजूर, शेंगदाणा चिक्की असे पदार्थ निवडले. शेवटी होता ‘सपना-बझार!’ त्यात अनेक गोष्टी मांडल्या होत्या. चॉकलेट्‌स, मॅगी, पेन्स, पाणी, कोल्ड्रिंक इत्यादी इत्यादी. प्रत्येक मूल खरेदी करून आलं, की त्याला तीन खोकी दाखवली जात. एकावर ‘गरज’ लिहिलं होतं. दुसऱ्यावर ‘सोय’ आणि तिसऱ्यावर ‘चैन’ लिहिलं होतं. जेव्हा आपण पाच रुपयांच्या पेनऐवजी पन्नास रुपयांचं पेन निवडतो, तेव्हा आपण ‘चैन’ करत असतो. मुलं नवे-नवे शोध लावत होती. शंभर रुपयांची खरेदी करा असं सांगितलं होतं, तर त्यांनी पाचशे रुपयांची केली. प्रश्‍न असा होता, की शंभर रुपये घेऊन जाऊन पाचशे रुपयांचा माल कोण देईल? तेव्हा मुलांची उत्तरं होती ः ‘आम्ही क्रेडिट कार्ड वापरू,’ ‘आमचा दुकानदार खात्यावर लिहून ठेवतो.’
एक मुलगा कॅडबरीची तीन पाकिटं घेऊन आला. ‘गरज’, ‘सोय’, ‘चैन’ या तिन्ही खोक्‍यांत एकेक पाकीट टाकलं आणि म्हणाला ः ‘‘भूक लागली, की ती माझी ‘गरज’ असते. सहलीला नेतो तेव्हा ‘सोय’ असते आणि घरी टीव्ही बघताबघता मजेत खातो तेव्हा ‘चैन’ असते.’’
एक मुलगी मॅगी नूडल्सची पाकिटं घेऊन आली आणि ती सगळी तिनं ‘गरज’मध्ये टाकली. तिला विचारलं तर ती म्हणाली ः ‘‘माझ्या आईचं नुकतंच निधन झालं. बाबांना अजून स्वयंपाक येत नाही. मलाही येत नाही. त्यामुळं सध्या ही आमची ‘गरज’ आहे.’’ सध्याच्या माध्यमविस्फोटाच्या जगात ही मुलं रोज जेवताना-खाताना-बाजारात असा विचार करतील का? ‘चैनीकडून गरजेकडं’ त्यांचा प्रवास व्हावा हाच हेतू असला पाहिजे.
चित्रपट रसग्रहण वर्ग हवेत
माध्यमांचं शिक्षण अभिनव पद्धतीनं करण्याचा ‘माध्यम-जत्रा’ हा सफल कार्यक्रम झाला. असंच प्रशिक्षण इतरही काही माध्यमांसाठी देता येईल. पाचवीपासून शाळाशाळांतून चित्रपट रसग्रहण वर्ग सुरू करायला हवेत. लहान मुलांसाठी असलेले किंवा मोठ्यांचे चित्रपट असूनही लहान मुलांच्या विचारांना, कल्पनाशक्तीला वाव देणारे असे चित्रपट उलगडून दाखवायला हवेत.
मोबाईल आणि आपण
वस्तू जेवढ्या वैयक्तिक वापराकडं वाटचाल करतील, तेवढ्या त्या पर्यावरणाला हानीकारक होतील, हे तर स्पष्टच आहे. घरात लॅंडलाइन फोन असला आणि ते सगळे वापरत असले तर त्यावर कुणाला फार खासगी बोलता येत नाही. मात्र, मोबाईल आला, की चार माणसं चार दिशांना तोंड करून स्वतःचं खासगी बोलत राहू शकतात आणि एकमेकांपासून दूर जातात. अर्थात मोबाईलचे चांगले उपयोग पुष्कळ आहेत, हे कुणीही मान्य करेल; पण केवळ वैयक्तिक मजेसाठी, चैनीसाठी तो वापरला जातो आहे. तो दुरुपयोग आहे. मुलांना या सगळ्या गोष्टी वापरण्यातल्या ‘तारतम्याचं बाळकडू’ पालकांनी, शिक्षकांनी वेळोवेळी द्यायला हवं.  
हेही जाणवतं आहे, की कोणतीही गोष्ट नवी असते, तोवर तिच्यावर अनेक दोषारोप होतात. मात्र, ती सरावाची झाली, की तिच्या दोषांकडं काणाडोळा होतो. तसंच मोबाईलचं झालं आहे. मात्र, प्रत्येक वस्तूच्या वापराच्या मर्यादा आपण जाणल्या पाहिजेत. अजूनही कटाक्षानं मोबाईल न वापरणारी मंडळी आहेत. पंखा न वापरणारी, छत्री न वापरणारी मंडळी आहेत. अर्थात त्यांचे व्यवसाय, त्यांची वयं लक्षात घेतली, तर हा सल्ला इतरांना देणं घवघड आहे.
मात्र, मोबाईलपासून सर्वांत धोका आहे तो लहान आणि तरुण मुलामुलींना. त्यांना मोबाईलवरचे खेळ खेळणं हे भलतं आकर्षण असतं. त्यातूनच ‘ब्लू व्हेल’सारख्या दुष्ट खेळाचा सापळा तयार झाला. कुणाच्या तरी ताब्यात गेल्यासारखी मुलं वागली. सांगितलेल्या सर्व अटी पाळत गेली आणि अखेर त्यांचे जीवही. त्या धोकादायक जाळ्यात सापडले. काय वाटलं असेल त्यांच्या पालकांना? वापराच्या अटीही समजावून सांगा अशा घटनामुळे वाटतं, की मोबाईल हातात देण्यापूर्वी त्याच्या वापराच्या अटी मुलांना समजावून द्यायला हव्यात. यातले धोके काय आहेत आणि त्यापासून दूर कसं राहता येईल याची चर्चा आवश्‍यक आहे.  मोबाईलवर गप्पा, इंटरनेटचा वापर हे वाटतं तितकं निष्पाप नाही. त्यातून तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं. तुमच्याशी अतिशय आदरपूर्वक व गोड बोलतात आणि त्यांची मुद्दे तयार असलेली एखादी ‘खेळसाखळी’ तुमच्या गळ्यात घालून तुमचा ताबा घेतला जातो. तुम्ही सावध असाल, वेळेवर त्या गटातून बाहेर पडलात तर वाचलात!
मुलांनी आपला मोकळा वेळ मोबाईल, आयपॅडसारख्या गॅजेट्‌समध्ये न घालवता आजूबाजूला चालू असलेल्या एखाद्या सामाजिक कामात त्यांना सहभागी होता येईल. एकेकटं कशात तरी रमण्यापेक्षा गटांनी काम करणं हे जास्त सुरक्षित, विधायक ठरतं. विशिष्ट वयात शरीरातल्या हार्मोनल घडामोडीमुळं मन अस्वस्थ होतं. स्वभाव हळवा होतो. अस्वस्थता चैन पडू देत नाही. मित्र-मैत्रिणीबद्दल आकर्षण वाटतं. शरीरातले बदल चैन पडू देत नाहीत. अशावेळी विधायक कामात गुंतता आलं पाहिजे. अशा कामात एकत्र येणाऱ्या तरुण-तरुणींची चांगली निरामय मैत्री होऊ शकते. पालक या सगळ्यांत एक दुवा म्हणून काम करू शकतात.
सहशिक्षणाची गरज
शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार मुलांच्या कुमार वयातल्या वागण्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, ‘‘पौगंडावस्थेनंतर मुला-मुलींना अनैसर्गिकरित्या वेगळे ठेवल्यामुळे शरीरशास्त्रीय - मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक असे सर्वच तर्कशास्त्र धुडकावणारी एक कृत्रिम, सामाजिक व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. मानवी इतिहासातली ती सर्वात मोठी विकृती आहे.’’
‘‘सहशिक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारचे काहीही मार्गदर्शक धोरण वा आदेश नाहीत. मुला-मुलींच्या शाळा वेगळ्या करणे हा प्रकार शोचनीय आहे. कारण त्यातून व्यक्तीचं मानवीपण हरवून जातं. जो मुलगा मुलीकडं एक वस्तू म्हणून पाहतो, तो स्त्रीशी मैत्रीचं नातं जोडण्याची संधी नष्ट करतो आणि अशा मैत्रीतून येणारी स्वतःच्या जीवनातली समृद्धीही गमावून बसतो. त्याच्या जीवनात लैंगिक इच्छेचं परिवर्तन जुलूम-जबरदस्तीत होतं. आपली महाविद्यालयं व विद्यापीठं अशा मुलांनी भरलेली आहेत. ‘सहशिक्षण’ हे या समस्येचं उत्तर असलं, तरी ते सोपं नाही. असं पाऊल उचलायचं असेल, तर शिक्षकांच्या प्रशिक्षणातही बदल करावे लागतील. चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक प्रतिमांचा फायदा घेतात. शाळानी स्वतःच्या माध्यमांतून म्हणजे पाठ्यपुस्तकं व इतर साहित्यांतून स्त्री-पुरुषांच्या वेगळ्या प्रतिमा निर्माण करायला हव्यात.’’
नवमाध्यमांचा पूरक वापर
तेव्हा नवमाध्यमांचा विचार करताना इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील.
  सहशिक्षण देणाऱ्या शाळा वाढवणं
  माध्यमांचं शिक्षण सर्व स्तरांवर देणं
  पालकशिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू करणं
  माध्यमांनी मुलांचा विचार करून निर्मिती करणं
  समाजानं मुलांचं भान ठेवणं
  शाळांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं.
दर बालदिनाला प्रत्येक संस्थेनं मुलांच्या भल्याचा एक निर्धार करावा आणि वर्षभर तो प्रत्यक्षात आणावा. तरच मुलींची आणि मुलांचीही परिस्थिती बदलेल.
माध्यमांचा असाही विचार ...
  •   ‘डोरेमॉन’सारखी काही कार्टून्स मुलांना दाखवायला हरकत नाही. त्यातून अनेक सर्जनशील कल्पनाही मुलांना मिळतील; मात्र त्याच वेळी ‘प्रत्येक वेळी डोरेमॉन आपल्याला मदतीला येत नसतो बरंका! आपली मदत आपल्यालाच करायला लागते,’ अशा प्रकारच्या गप्पा मारून मुलांना पुन्हा जमिनीवर आणायलाही शिकवा.
  •   मोबाईलवरच्या हिंसक गेम्स का वाईट असतात, हे मुलांना आवर्जून समजावून सांगा. मात्र, त्याच वेळी त्यांना या माध्यमाशीही मैत्री करू देणाऱ्या, तंत्रज्ञानाच्या जगाची चुणूक दाखवून देणाऱ्या त्यांच्या वयाला साजेशा काही गेम्स जरूर खेळायला द्या.
  •   पुस्तकांचे नवे ट्रेंड्‌स कोणते आहेत ते मुलांकडूनच जाणून घेऊन, ती पुस्तकं मुलांना जरूर वाचायला द्या. पुस्तकं विकत घ्या किंवा मुलांना जिथं निवडीसाठी वाव असेल, अशा ग्रंथालयांत आवर्जून नोंदणी करा.
  •   चित्रं काँप्युटरवर काढणं मुलांना आवडतं. मात्र, हातानं चित्र काढण्यातली सर्जनशीलता त्यांना दाखवून द्या आणि काँप्युटरवरच्या तंत्रज्ञानामुळं काय साधता येतं हेही दाखवून द्या.
  •   ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’ अशा सोशल नेटवर्किंग साइट्‌स; क्रेडिट कार्डस, एटीएम मशीन्स अशा गोष्टींशी मुलांचा थेट संबंध नसतो. मात्र, त्याबद्दल ती विचारणा करत असतात. मात्र, अशा वेळी मुलांना झिडकारू नये. ‘तुला काय करायचंय आत्ता’ असे प्रश्‍न न विचारता त्यांना या नव्या गोष्टींचे फायदे-तोटे समजावून सांगा. तंत्रज्ञानाशी संबंधित एखाद्या छोट्या कृतीत मुलांना अधूनमधून सहभागी करून घ्या; मात्र ‘हे सगळं या वयात करण्यासाठीचं नाही,’ याचं भानही वेळोवेळी देत राहा.   
  •   अनेक गोष्टी पारंपरिक माध्यमांद्वारे शिकवता येत नाहीत, अशा वेळी छोट्या दोस्तांसाठी तयार केलेल्या काही वेबसाइट्‌स, काही ॲप्स यांचा आवर्जून वापर करा. संगीत, चित्रं, ॲनिमेशन, रंग, आवाज या सगळ्या गोष्टींचा मिलाफ करणं नव्या तंत्रज्ञानामुळं शक्‍य होत असल्यामुळं अनेक गोष्टी समजायला सोप्या जातात, हेही लक्षात घ्या.
  •   लहान मुलांसाठीचे चित्रपट कमी झाले आहेत, हे खरं असलं, तरी नेटवर जगभरातले अनेक चित्रपट असतात. त्यांचीही ओळख मुलांना करून द्या. काही वेळा पालक त्यांच्यासाठीचे चित्रपट बघायला मुलांना नेतात. त्यापूर्वी तो चित्रपट लहान मुलांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे का, हे कुणाला तरी जरूर विचारा.
  •   टीव्ही, चित्रपट वगैरेंसारख्या दुनियेपासून मुलांना एकदम न तोडता त्यांचा संयमित ‘डोस’ आणि मजा मुलांना जरूर घेऊद्यात.
  •   चित्रपट, टीव्हीची दुनिया एक स्वप्नमय विश्‍व आपल्यासमोर निर्माण करतं. मात्र, हे जग आभासी असतं, याचीही जाणीव मुलांना वेळोवेळी करून देत राहा.